शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

बॅँक घोटाळेबहाद्दरांना आर्थिक दंड आवश्यक : वाय. व्ही. रेड्डी -शिवाजी विद्यापीठात बँकआॅफ इंडिया अध्यासनातर्फे व्याख्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 01:04 IST

बॅँकांमध्ये घोटाळे करणाऱ्यांना केवळ शिक्षा पुरेशी नसून, त्याबरोबरच त्यांना आर्थिक दंड करणे आवश्यक असल्याचे मत रिझर्व्ह बॅँकेचे माजी गव्हर्नर डॉ. वाय. व्ही. रेड्डी यांनी व्यक्त केले

कोल्हापूर : बॅँकांमध्ये घोटाळे करणाऱ्यांना केवळ शिक्षा पुरेशी नसून, त्याबरोबरच त्यांना आर्थिक दंड करणे आवश्यक असल्याचे मत रिझर्व्ह बॅँकेचे माजी गव्हर्नर डॉ. वाय. व्ही. रेड्डी यांनी व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठातील बॅँक आॅफ इंडिया अध्यासनातर्फे आयोजित व्याख्यानावेळी ते बोलत होते.

राजर्षी शाहू स्मारक भवन येथे शनिवारी सायंकाळी झालेल्या या व्याख्यानाच्या अध्यक्षपदी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते. यावेळी व्यासपीठावर रिझर्व्ह बॅँकेच्या माजी डेप्युटी गव्हर्नर उषा थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. रेड्डी यांनी ‘बॅँकांची सुरक्षितता’ या विषयावर आपले विचार मांडले.

डॉ. रेड्डी म्हणाले, बॅँकामध्ये ठेवी ठेवताना नागरिक सर्व बाजूंनी विचार करतात. १०० टक्के ठेवी सुरक्षित आहेत, असे म्हणता येत नसले तरी त्या नाहीत असेही म्हणता येत नाही. २००१ साली अनुत्पादित कर्जाचे प्रमाण आतापेक्षा खूपच जास्त होते. मात्र नंतर त्यामध्ये सुधारणा होत गेल्या.

जगभरामध्ये २००८ मध्ये आर्थिक संकटामध्ये अनेक बॅँका अडचणीत आल्या तेव्हासुद्धा भारतातील बॅँका टिकून राहिल्या, याची आठवण करून देत डॉ. रेड्डी यांनी यासाठीची आपली आधीपासूनच तयारी होती असे नमूद केले. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी प्रास्ताविक केले. त्यांच्या हस्ते यावेळी डॉ. रेड्डी आणि बॅँक आॅफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक नितीन देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. अध्यासन प्रमुख डॉ. व्ही. बी. ककडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. व्ही. डी. नांदवडेकर, ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष यशवंत थोरात, व्ही. बी. पाटील, अभय गांधी, बाळ पाटणकर, रवी शिराळकर, किरण कर्नाड, आदी मान्यवर उपस्थित होते.एसपीपी थोरात यांना अभिवादन !व्याख्यानाच्या सुरुवातीलाच डॉ. रेड्डी यांनी ले. जनरल एसपीपी थोरात यांना अभिवादन केले. चीनबाबत या कोल्हापूरच्या सुपुत्राने दिलेला सल्ला मानला नाही आणि त्याची किंमत आपल्याला चुकवावी लागली, असे ते म्हणाले.कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठातील बॅँक आॅफ इंडिया अध्यासनातर्फे शनिवारी रिझर्व्ह बॅँकेचे माजी गव्हर्नर डॉ. वाय. व्ही. रेड्डी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी रिझर्व्ह बॅँकेच्या माजी डेप्युटी गव्हर्नर उषा थोरात, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे उपस्थित होते.

टॅग्स :Bank of Indiaबँक ऑफ इंडियाkolhapurकोल्हापूर